महाराष्ट्र दिन समिक्षण


 १ मे महाराष्ट्रदिन ई विशेषांक
चला घडवूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  समीक्षण मीनाक्षी नागराळे - वाशीम
३ मे २०२०
*

      एक मे महाराष्ट्र दिन जसा महाराष्ट्राची कीर्ती सांगणारा, निर्मिती सांगणारा,व कामगार दिन म्हणून साजरा होणारा दिवस.. तसाच महाराष्ट्रातल्या तळागळातील ग्रामीण भागातील सर्व शिक्षिका भगिनींना एकत्र ठेवून त्यांचे शब्द,भाव, उपक्रम, गीत, लेख एका विशेषांकात प्रस्थापित करणारा हा विशेषांक आहे. हा ओन्ली सुपर ॲक्टिव शिक्षिका समूहाचा खास उपक्रम आहे... महाराष्ट्र दिन विशेषांक हा ई स्वरूपात 1 मे 1920 रोजी विशेषांक प्रकाशन सोहळा ओन्ली सुपर अॅक्टीव्ह समूहात आनंदात पार पडला...
     या विशेषांकाचे मुखपृष्ठ फार बोलके व नावाला साजेसे असेच आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी अहोरात्र झटणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनांशी, शत्रूंशी कशी टक्कर देऊन महाराष्ट्र वाचवला.. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र व कामगार दिनाच्या स्टॅच्यू घेतला आहे. त्यामध्ये चला घडवूया  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे ध्येय घेतले आहे. तर राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाचा लोगो ज्यात सावित्रीचा फोटो आहे. तो आणखीनच उठावदार दिसत आहे.
       *संपादक सुदाम दादा साळुंके सर आहेत.मुखपृष्ठ व सजावट उमेश साळुंखे यांनी केली आहे त्यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेला हा विशेषांक शिक्षिका भगिनी साठी सुखाची पर्वणीच ठरली आहे*  तरीसुद्धा साळुंके दादा यांचे ब्रिद  *"ज्ञान-मान-सन्मान"*  या उक्तीप्रमाणे राज्यातल्या सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी ई साहित्याची निर्मिती केली. करुणाताई गावंडे, वैशाली भामरे,रेखा शिंदे यांनी सहकार्य केले. नाशिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली झनकर मॅडम यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं जग ठप्प असताना ओन्ली सुपर एक्टिव शिक्षिका समूहाचा मराठी मातीला मानवंदना देण्यासाठी हा अनोखा उपक्रम सर्वांना दिशादर्शक असाच आहे.
        मा.पोपटराव काळे,शिवाजी नाईकवाडे, साहेबराव शिंदे,दिलीप ढेपले साहेब यांच्या शुभेच्छा लाभले आहेत. यात 24 लेख व 23 कविता प्रकाशित आहेत. श्रीमती उषा ढेरे यांची महाराष्ट्र भूमी हा पोवाडा मराठी मातीला साज चढवणारा आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या भूमिकेत पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे? हे प्रतिभा राऊत यांच्या लेखातून महत्त्व कळते. तर जया कुलथे यांची आई वरची रचना मातेचा गोडवा भरते. गुंफा कोकाटे यांचा टाळेबंदी  हा लेख माणसातला माणूस जागे करतो. वासंती कोंडाळे यांची महाराष्ट्राची महानता ही कविता काळजाला स्पर्शून जाते. तर  *मीनाक्षी नागराळे* (अर्थात माझी) ही कविता विज्ञानाची सांगड घालणारी व कवितेचे गुढ उकलते.अंजू जोशी यांचा लेख आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात कम्प्युटरचे महत्त्व विशद करतो धनश्री गांगुर्डे यांचा सावित्रीबाई फुले लेख विज्ञानाची महती सांगतो.
         मीनाक्षी काटकर यांची महाराष्ट्र गीत ही कविता थोर वीरांची महती सांगते *शेख नजमा यांची मंगेश शिष्यवृत्ती*  हा लेख वडिलांचे छत्र हरवलेल्या मंगेश ची यशोगाथा काळजाला स्पर्श करणारी आहे तर सुनीता इंगळे यांची पुस्तक कविता पुस्तकाचे महत्त्व विशद करून जाते. मानवी मनामध्ये विचारांचा कहर कसा चालतो? ही कल्पना झाल्टे यांची कविता सांगून जाते. मनीषा कुलकर्णी यांचा लेख समूहाचे महत्व विशद करणारा आहे.तर रांगोळ्या, स्केच, चित्र,शुभेच्छा यांनी आणखीन साज चढला आहे.उर्मिला लासूरकर वर्षा भोळे यांच्या महाराष्ट्राची यशो गाथा सांगणाऱ्या कविता आणखीन भर टाकतात. शोभा दळवी व मंगला अनासपुरे यांच्या शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज कशी ठरते हे सांगतो आहे.छाया कांबळे, सुनिता वावधाने यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून सांगितली आहे.ओंकारेश्वरी खडसे ह्या चिमुकल्या विद्यार्थिनीने "ओ "ची गंमत आपल्या काव्यातून सांगितली आहे. मनीषा शेजोळे यांनी काव्यातून महाराष्ट्राचे गुणगान गायले आहे.तर रेखा शिंदे यांचा लेख गुरुजींचे महती सांगतो.
        श्री अनुज ढुमणे यांनी लेखातून त्यांचे उपक्रमशील शाळेचे दर्शन घडवले आहे.कविता पुदाले यांनी व मंगला बोपचे यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून रचली आहे. *मधुकर माळी व सुदाम साळुंखे सर निर्मित शाळा अॅप ची माहिती व डाऊनलोड क्यू आर कोड सहित विद्यार्थी व शिक्षकांसाठी देण्यात आलेला आहे.* वैशाली भामरे यांचा लेख कोरोना जनजागृती करतो आहे. नीलिमा चिंचकर यांचा वेबसाईट पर्यंतचा प्रवास लेखाद्वारे मांडला आहे. स्मिता नवघरे व छाया कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्र गौरव गाथा काव्यातून व्यक्त केली आहे. सुनिता इंगळे यांनी स्टडी फ्रॉम होम चे महत्व विशद केले आहे. योगिता कोठेकर व कल्पना झाल्टे यांनी सावित्रीचे महत्त्व विशद केले आहे. प्रतिभा साळुंके यांनी महाराष्ट्राची प्रश्नमंजुषा तयार केली आहे. हे खेमनकर -कोरडकर यांनी मूल्य शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. *करुणा गावंडे यांचे उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी पडणारे आहेत.*  शितल मापारी, चित्ररेखा जाधव,अरुण पवार, वंदना कोषटवार यांनी पालकांना मुलांना खेळू द्या असे आवाहन केले आहे. तर सुरेखा ढोले यांचे बडबड-गीताने साद घातली आहे. स्मिता नवघरे यांनी क्रांती सूर्याला वंदन काव्यातून केले आहे.  *संपादक श्री सुदाम साळुंखे यांच्या आठवणीतील शाळा प्रवास सुंदरपणे शब्दबद्ध केला आहे.*
      शेवटी डिजिटल गॅलरी मध्ये वेगवेगळे ॲप्स बालभारती पुस्तके व राज्यातल्या आदर्श तंत्रस्नेही शिक्षक शिक्षकांचे ब्लॉग व त्यांचे Qr code च्या स्वरूपात दिली आहे. कोणत्याही Qr code ला टच केले की त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा एका सेकंदात पाहायला मिळतो. असे मलपृष्ठ अति महत्त्वाचे आहे.तसेच शेवटचे पान खूप महत्त्वाचे व जपून ठेवून उपयोगी पडणारी असेच आहे. एकूण 66 पानांचे हे महाराष्ट्र दिन विशेषांक प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने राज्यातल्या इतर शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाचे एक पानच व तंत्रस्नेही ची जणू खाणच म्हणावी लागेल. या पहिल्या ऑनलाईन ई विशेषांकासाठी खूप खूप शुभेच्छा.....

*समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव*
*ता.जि.वाशिम...*
*मो.९७६७६६३२५७*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment